शेतकऱ्यांचा संघर्ष नाटकी - केंद्रिय कृषिमंत्री राधामोहन सिंह

शेतकऱ्यांचा संघर्ष नाटकी - केंद्रिय कृषिमंत्री राधामोहन सिंह

पाटणा - बळीराजाचे प्रश्न काय आहेत हे ऐकून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यांचा संघर्ष 'नाटकी' असल्याचे वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांच्या संपाविषयी केले आहे. शेतकरी आंदोलन म्हणजे एक प्रकारचा 'पब्लिसिटी स्टंट' असल्याचं त्यांनी म्हटले आहे. 

देशभरात १ जूनपासून दहा दिवस शेतकऱ्यांचा संप आहे. या आंदोलनाविषयी पाटणा येथील कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना माध्यमांमध्ये झळकण्यासाठी असं काहीतरी करावं लागतं, आणि शेतकरी संप हे त्याचेच उदाहरण आहे असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

सरकारची उदासीनता तसेच नैसर्गिक आणि आर्थिक संकटाचा सामना करणारे देशभरातील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत, तर दुसरीकडे राजकीय नेते आणि मंत्री शेतकऱ्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवत आहेत. त्यात केंद्रिय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनीही भर टाकली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com