'राज्यात राजकीय बदल होणे आवश्‍यक आहे आणि युतीच्या कचाट्यातून सुटका व्हावी' : येडियुराप्पा

'राज्यात राजकीय बदल होणे आवश्‍यक आहे आणि युतीच्या कचाट्यातून सुटका व्हावी' : येडियुराप्पा

बंगळूर : कुंदगोळ व चिंचोळी पोटनिवडणुकीत भाजप विजयी झाल्यास राज्यात राजकीय उलथापालथ अटळ आहे, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांनी केला आहे. ते गुरुवारी (ता. 19) हुबळीत पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, "राज्यात राजकीय बदल होणे आवश्‍यक आहे. युतीतील वादांमुळे राज्याचा विकास खुंटला आहे. युतीच्या कचाट्यातून सुटका व्हावी, अशी जनतेची इच्छा आहे. युतीतील वाद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. लोकसभा निवडणूक निकालानंतर त्यात भर पडण्याची शक्‍यता आहे. युती सरकारचे पतन करण्याचा कट आम्ही रचलेला नाही. धजद आमदार किंवा नेते आपल्या संपर्कात नाहीत. आम्ही विरोधी पक्षात राहून काम करण्यास तयार आहोत. पण, युतीतील वादच सरकारचे पतन करतील.''

वीरशैव लिंगायत समाजाची मते मागण्याचा नैतिक हक्क कॉंग्रेस पक्षाला नाही. सिध्दरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल खालच्या पातळीवर केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. सिध्दरामय्यांचे समर्थक वारंवार भांडणे करीत आहेत. आपापसातील भांडणातूनच सरकारचे पतन होणार आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांना मुख्यमंत्री करायला हवे, या मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title : 'Political change in the state is necessary and get rid of allies': Yeddyurappa

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com