केंद्र सरकारनं साखरेवरील आयातशुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. सारखेचे घसरलेले दर, कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणारा फटका यावर उपाय म्हणून केंद्रानं हा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. ठोक बाजारात साखरेचे दर घसरले होते. या दर घसरणीवर उतारा म्हणून केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय. आयात शुल्कात 50 टक्क्यांऐवजी 100 टक्के इतकी वाढ करण्यात आलीय. याचा फायदा कारखानदारांना होणार आहे. त्याचबरोबर ऊसाला योग्य भाव देणंही कारखानदारांना शक्य होईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.