शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केल्यापासून, प्रत्यक्ष लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा होईपर्यंतच्या काळातील कर्जावरील व्याज शेतक-यांकडे मागणा-या. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका बरखास्त करण्यात येतील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला. या कालावधीतील व्याजाची वसुली बँकांनी शेतक-यांकडून करू नये, असा निर्णय राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. असं असतानाही चार-पाच बँका व्याजाची ही रक्कम शेतकऱ्यांनी भरावी यासाठी सक्ती करीत आहेत. त्याचबरोबर, कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना 1 मार्च ते 31 मार्च या कालावधीत कर्जमाफीसाठी अर्ज करता येणार आहे
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.