आजच्या घडीला मुंबईकरांची सर्वात मोठी समस्या काय असं म्हटलं तर ती लोकल प्रवासाची. पिक टाईमला तर मुंबईकरांची अवस्था गुरा - ढोरांसारखी असते.
कितीदा लोकांचे जीव जातात, अपघात घडतात. पण, पर्याय काय तर काहीच नाही. तीच लोकल पकडायची, ऑफीस आणि घर गाठायचं.
हीच लोकल आधी ९ डब्ब्यांची होती, मग ती १२ डब्यांची करण्यात आली, आता तर ही लोकल १५ डब्यांची झालीय, पण तरी समस्या काही सुटली नाही. उलट दिवसेंदिवस ही समस्या रौद्र रुप धारण करतेय. त्यामुळंच डबलडेकर लोकल सुरु करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत.
मेट्रो, कोस्टल रोड या गोष्टींनी गर्दी आटोक्यात येईल, पण ती सुरु होण्यासाठी आणखी काही कालावधी आहे. तोपर्यंत डबलडेकर लोकलचा विचार करायला हरकत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.