2010 ते 2019 दरम्यान भारताची लोकसंख्या 136 कोटींवर

2010 ते 2019 दरम्यान भारताची लोकसंख्या 136 कोटींवर

संयुक्त राष्ट्र - संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार एक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारताची लोकसंख्या 136 कोटींवर पोहोचली असल्याचे म्हटले आहे. 2010 ते 2019 या काळात वार्षिक 1.2 टक्के दराने ही वाढ झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे. हा दर चीनच्या वार्षिक लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा  निम्म्याने जास्त आहे. 

भारताची लोकसंख्या 1969 मध्ये ती 54.12 कोटी इतकी होती. तर 1994 मध्ये ती 94.22 कोटी इतकी होती. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, भारतात 1969 मध्ये प्रतिमहिना एकूण जन्मदर 5.6 टक्के इतका होता. तो 1994 मध्ये 3.7 टक्के राहिला. मात्र, भारताने जन्मवेळच्या सरासरी आयुर्मानात सुधारणा नोंदवली आहे.

1969 मध्ये जन्माबरोबरच सरासरी आयुर्मान हे 47 वर्ष होते. 1994 मध्ये 60 वर्ष झाले त्यानंतर 2019 मध्ये ते 69 वर्ष झाले. जगाच्या आयुर्मानाचा सरासरी दर 72 वर्ष आहे. अहवालात 2019 मध्ये भारताच्या लोकसंख्येच्या आकडेवारीचा एक आलेख दिला आहे. यामध्ये म्हटले आहे की, देशाची 27-27 टक्के लोकसंख्येचे आयुर्मान हे 0 ते 14 आणि 10-24 वर्ष इतके आहे. तर देशाची 67 टक्के लोकसंख्या 15-64 या वयोगटातील आहे.

देशाची 6 टक्के लोकसंख्या 65 वर्ष वयाची आणि त्यापेक्षा अधिक वयाची आहे. भारताच्या आरोग्य सुविधा प्रणालीच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. देशात माता मृत्यूदर 1994 मध्ये एक लाखांमागे 488 इतका होता. त्यात घट होऊन 2015 मध्ये हा दर प्रती लाख 174 मृत्यू इतपर्यंत खाली आला. मात्र, युएनएफपीएचे संचालक जेनेवा मोनिका फेरो यांनी ही आकडेवारी चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. हा दर आणखी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करताना महिलांचे मृत्यू थांबवण्यासाठी गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवांमध्ये वाढ होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Indias Population Grew Up To 136 Billion Between 2010 2019 says UN Report

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com