आज्या आणि शितलीच्या 'लागिरं झालं जी' मालिकेबद्दल वाईट बातमी

आज्या आणि शितलीच्या 'लागिरं झालं जी' मालिकेबद्दल वाईट बातमी

मुंबई : आज्या आणि शितलीची प्रेमकहाणी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.पण आता लागिरं झालं जीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. ‘लागिरं झालं जी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.या मालिकेचा चाहता महाराष्ट्रातील घराघरात पोहचला आहे. 

अभिनेत्री शिवानी बावकर, नितिश चव्हाण, राहुल मगदूम, निखिल चव्हाण हे सगळे कलाकार या मालिकेमुळे चांगलेच प्रकाशझोतात आले. महत्त्वाचे म्हणजे या मालिकेमुळे चांदवडी या पुनर्वसित गावातील लोकांना रोजगार मिळाला. चांदवडी हे गाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचलं. मालिकेतील आपले लाडके कलाकार आज्या, शितली, राहुल्या, भैय्यासाहेब यांची एक झलक बघण्यासाठी गावात गर्दी होऊ लागली. पण आता लागिरं झालं जीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे.

अडीच वर्षांपूर्वी सुरु झालेला हा संस्मरणीय प्रवास अखेर थांबतोय. मालिकेचा शेवट कसा होणार याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे.  येत्या 22 जून रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या मालिकेच्या जागी मिसेस मुख्यमंत्री ही नवी मालिका सुरु होणार आहे.

WebTitle : marathi news lagira zala ji marathi serial to get over soon 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com