आरक्षणाच्या मागणीसाठी आता येत्या १५ ऑगस्टपासून चूलबंद करून अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची घोषणा मराठा समन्वय समितीनं केलीय. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत समितीनं ही घोषणा केली.
मूक मोर्चा, ठोक मोर्चा, ठिय्या आंदोलन आणि महाराष्ट्र बंदनंतर आता मराठा समन्वय समितीनं रस्त्यावरील आंदोलन न करण्याचा निर्णय घेतलाय. मागण्या मान्य होईपर्यंत तालुका स्तरावर साखळी उपोषण करणार असल्याचंही समितीनं जाहीर केलं.
काल झालेल्या महाराष्ट्र बंदमध्ये बाह्यशक्ती घुसल्यामुळेच तोडफोड झाली. त्याचा मराठा आंदोलकांशी काहीही संबंध नसल्याचा दावाही समितीनं केलाय.
WebTitle : marathi news maratha reservation maharashtra annatyag agitation
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.