गेल्या काही दिवसांपासून कठुआ आणि उन्नाव मधील बलात्काराच्या घटनांनी देश हादरुन गेलाय. अशातच नॅशल क्राईम रेकॉड ब्युरोनं एक धक्कादायक आकडेवारी समोर आणलीये. देशात दर दिवाशी 107 महिला बलात्काराच्या घटनांना बळी पडत असल्याचं समोर आलंय. 2016 या वर्षात देशात बलात्काराच्या तब्बल 38 हजार 947 घटना घडल्याचं समोर आलंय. या आकडेवारीमुळे देशातील महिला आजही सुरक्षित नाहीयेत, हे अधोरेखित झालंय. बलात्काराच्या घटना हा आपल्या देशाला लागलेला एक कलंक आहे. गेल्या काही दिवसांत मुलींच्या छेडछाडीच्या, बलात्कार आणि हत्येच्या वाढत्या घटना ही एक मोठी समस्या बनू लागलीये. देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.