राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आजपासून सलाम करण्यासाठी आजच्या एवढा चांगला दिवस नाही : अनुपम खेर

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आजपासून सलाम करण्यासाठी आजच्या एवढा चांगला दिवस नाही : अनुपम खेर

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हल्ल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आजपासून सलाम करण्यासाठी आजच्या एवढा चांगला दिवस नाही, असे अभिनेते अनुपम खेर यांनी म्हटले आहे.

भारतीय हवाई दलाने हल्ला केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना सलाम केला आहे. राहुल गांधींच्या या ट्विटवर रिट्विट करताना अनुपम खेर यांनी हे ट्विट केले आहे.

भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानमधील बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचा बॉम्ब टाकण्यात आल्याने जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा कंट्रोल रुम उद्ध्वस्त झाले आहे. पाकिस्तान हद्दीत मोठी कारवाई केल्याची माहिती पाकिस्तानच्या लष्कराच्या प्रवक्त्याने दिल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईची माहिती सर्वांसमोर आली. भारतीय हवाई दलाच्या मिराज या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे बॉम्ब टाकला. या हल्ल्याबद्दल देशभरातून जवानांचे कौतुक करण्यात येत आहे.

Web Title: 'Rahul Gandhi should now salute Modi' - anupam kher

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com