अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था पाच लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साकारण्याची रूपरेषा समोर ठेवून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शुक्रवार) अर्थसंकल्प सादर केला.
आर्थिक आघाडीवरील सरकारच्या कामकाजाचा मागील वर्षभरातील लेखाजोखा मांडणारा आर्थिक पाहणी अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेला सादर केला. या अहवालातील निष्कर्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटद्वारे समाधान व्यक्त केले होते. आज सकाळी त्यांनी राष्ट्रपतींकडे अर्थसंकल्प सुपूर्द केल्यानंतर त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. तसेच अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री आहेत.
'यंदाची निवडणूक ही आम्हाला विश्वास देणारी ठरली. नागरिकांनी आम्हाला न्यू इंडिया करण्यासाठी मतदान केले. काम करणारे सरकार अशी आमची ओळख झाली आणि त्याला नागरिकांनी पसंती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची कार्यशैली नागरिकांना आवडली. गेल्या पाच वर्षांत न्यू इंडियासाठी कार्य सुरु केले असून, तेच पुढे जाईल,' असे मत अर्थमंत्री सितारामन यांनी मांडले.
अर्थसंकल्पातील प्रमुख वैशिष्ट्ये
Web Title: Union Finance Minister Nirmala Sitharaman presents union budget in Parliament
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.