नीतेश राणेंवर कारवाई होते, मग तिवरे दुर्घटनेच्या गुन्हेगारांवर का नाही - निलेश राणे

 नीतेश राणेंवर कारवाई होते, मग तिवरे दुर्घटनेच्या गुन्हेगारांवर का नाही - निलेश राणे

चिपळूण (रत्नागिरी): तिवरे धरण दुर्घटनेप्रकरणी अधिकाऱ्यांसह आमदार सदानंद चव्हाण यांच्यावर 302 कलमाखाली गुन्हा दाखल करा, अशी मागणी माजी खासदार नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

सिंधुदुर्गात आमदार नीतेश राणे यांच्यावर कारवाई होते, तर मग 23 बळी घेणारे आमदार चव्हाण यांच्यावर कारवाई का नाही, असा सवाल त्यांनी केला. 

ते म्हणाले, तिवरेमध्ये आपद्‌ग्रस्तांना शासनाकडून तातडीची मदत देण्यात आली. ही मदत आपदग्रस्तांसाठी नाही तर ते आक्रमक होऊन प्रकरण चिघळू नये म्हणून आहे. आमदार चव्हाण यांना वाचवण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. दुर्घटना घडून चार दिवस झाले. सिंधुदुर्गमध्ये आमदार नीतेश राणे यांनी महामार्ग अधिकाऱ्यांवर चिखल फेकला म्हणून त्यांच्या विरोधात तातडीने कारवाई झाली. तिवरे धरण दुर्घटनेची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत ना अधिकाऱ्यावर कारवाई झाली ना आमदारांवर केस दाखल झाली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हे प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणणार आहे. आमदार चव्हाण यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी मी करणार आहे. तिवरे धरणाचे आयुष्य 100 वर्षांचे असताना 14 वर्षांतच धरण फुटले कसे? 4 कोटींचे काम 14 कोटींवर गेले कसे? हे कामच पूर्ण बोगस झाल्याचा आरोप त्यांनी केला. 

तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचे विधान जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी केले. त्यांच्या विधानाचा राणेंनी समाचार घेतला. खेकड्यांनी धरण फोडले असे विधान करणाऱ्या मंत्र्यांना चपलाचा हार घालावासा वाटतो. खेकड्यांमुळे धरण फुटले, असे जगातले एक तरी उदाहरण दाखवा, हा सर्व जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: nilesh rane criticise tanaji sawant

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com