गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांनी रौद्ररुप धारण केलंय. गेल्या सहा दिवसांपासून पडणाऱ्या कोसळधारा मुळे जिल्ह्यात पाणीच-पाणी झाले आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून ती पात्राबाहेर आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 63 गावांचा संपर्क देखील तुटला आहे. पावसामुळे पाच राज्यमार्ग आणि 13 जिल्हामार्गावरी वाहतूक अंशत: बंद करून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नद्या-ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील तब्बल 62 बंधारे पाण्याखाली गेले.
राधानगरी धरणातून प्रतिसेकंद 16 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
WebTitle -marathi news panchaganga river overflow
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.