का केली जात नाही पितृपंधरवड्यात खरेदी ? पितृपंधरवडा म्हणजे नेमकं काय ? 

का केली जात नाही पितृपंधरवड्यात खरेदी ? पितृपंधरवडा म्हणजे नेमकं काय ? 

गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर आता पितृपंधरवड्याला सुरूवात झालीय. या पंधरा दिवसात पितरांचं म्हणजेच पुर्वजांचं स्मरण केलं जातं. पण याकाळात कुटुंबात कोणतंही शुभकार्य, उत्सव अथवा समारंभ केले जात नाहीत. इतकच काय तर नवीन वस्तूंची खेरीदीही केली जात नाही. यामागची वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांना भेटले आणि त्यांच्याकडून पितृपंधरवड्याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. 

इतकच नाही तर पितृपंधरवड्यात मुहुर्त का नसतात. याविषयीही आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतलं. 

अंधश्रद्धा निर्मुलन समितीनंही पितृपंधरवड्यातल्या गैरसमाजावर बोट ठेवलंय. 
सण, उत्सव साजरे करणं, परंपरा पाळणं यात गैर काहीच नाही. पण यातून गैरसमज निर्माण होणार नाहीत हेही पाहणं तितकचं महत्वाचं आहे. त्यामुळे पितृपंधरवडा अशुभ नाही हेच यातून स्पष्ट होतंय. 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com