राम मंदिर उभारणीला वेळ लागणे ही बाब वेदनादायी : आरएसएस

राम मंदिर उभारणीला वेळ लागणे ही बाब वेदनादायी : आरएसएस

मुंबई : ''राम मंदिर व्हावे, ही सर्वांची इच्छा आहे. राम मंदिराची उभारणी व्हावी, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मागणी आहे. मात्र, राम मंदिर उभारणीला वेळ लागणे ही बाब वेदनादायी आहे'', अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी आज (शुक्रवार) नाराजी व्यक्त केली.

भैय्याजी जोशी यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे - 

- राम मंदिर व्हावे ही सर्वांची इच्छा

- न्यायालयाने लोकांच्या भावनांचा आदर करावा.

- गरज पडल्यास पुन्हा आंदोलन उभारू.

- राम उभारणी व्हावी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मागणी.

- राम मंदिरासाठी जमीन अधिग्रहणाच्या मागणीला जोर.

- राम मंदिर उभारणीला वेळ लागत आहे हे वेदनादायी.

- न्यायालयाचा आम्ही कधीही अनादर केला नाही.

- आंदोलनकर्त्यांवर जी मर्यादा येते याची जाणीव आहे.

- आम्ही न्यायव्यवस्थेचा आदर करतो.

- शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत जोशी म्हणाले -

- धार्मिक विधीमध्ये महिला-पुरुष भेदभाव नाही.

- काही मंदिरात नियम असतात त्यानुसार ते पाळावे लागतात.

- मंदिराच्या प्रवेशाबाबत आपल्याला वाटते आपल्या अधिकारांवर गदा येते.

- जनतेच्या अधिकारांचे रक्षण करणे कायद्याचे काम आहे.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com