पीकविम्याच्या प्रश्नावरून शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय.17 तारखेला शिवसेनेचा पिकविमा कंपन्यांवर धडक मोर्चा काढणार आहे. मुंबईतले शिवसैनिकही या मोर्चात सहभागी होणार आहे. शेतकऱ्यांबाबत योग्य निर्णय झाला नाही तर शिवसेनेच्या भाषेत उत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी दिलीय. शेतकऱ्यांसाठी सरकारच्या योजना चांगल्या असल्या तरी त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. दरम्यान आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणार नसल्याचही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय.
WebTitle : marathi news shivsena to march on the offices of insurance companies for the farmers
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.