रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघ पुलावामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी भारतीय लष्कराची टोपी घालून उतरणार आहे. नाणेफेकीपूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने संघातील सर्व खेळाडूंना या टोप्यांचे वाटप केले.
बीसीसीआयतर्फे दरवर्षी भारतीय लष्कराला मानवंदना देण्यासाठी एक सामना खेळण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ही कल्पना धोनी आणि कोहलीने दिली आहे. तसेच या सामन्याचे संपूर्ण मानधन टीम इंडिया हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना देणार असल्याची घोषणा कोहलीने केली आहे.
Web Title: Indian team to wear special caps for indian army
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.