नवी दिल्ली - हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये भारतीय वायुसेनेनी केलेल्या हल्ल्याचे टायमिंग फक्त सात जणांनाच माहीत होते.
बालाकोट येथे असलेल्या जैश-ए-मोहम्मदचे तळ भारताने 26 फेब्रुवारी रोजी केलेल्या कारवाईत उद्ध्वस्त केले. अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली होती.
पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि इंटेलिजेन्स ब्युरो आणि रॉ या दोन गुप्तहेर संघटनांचे प्रमुख. यांनाच या हल्ल्याच्या टायमिंगची माहिती होती. मंगळवारी सकाळी 3.40 ते 3.53 या काळात हा हल्ला झाला.
Web Title: online 7 people knows about airstrike in pakistan
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.