कोल्हापुरात मटणप्रश्न काही सुटत नाहीए... बंद पाळला जातोय... आंदोलन केलं जातंय.. मात्र कोल्हापूरकरांच्या ताटात तांबडा पांढरा काही दिसत नाहीए.... आणि यामागचं कारण आहे, दक्षिण भारतातले खाटिक... जे कंटेनरच्या कंटेनर भरून बकऱ्या चेन्नई आणि बंगळुरूत घेऊन जातायत...
राज्यातील आठवडा बाजारांतून दाक्षिणात्य खाटिक मोठ्या प्रमाणावर बकरी खरेदी करतात... जिथे आपल्याकडचे खाटिक केवळ 60 ते 70 बकऱ्या घेऊन जाऊ शकतात... तिथे हे खाटिक आपल्या कंटनेरमधून एकाचवेळी 700 बकऱ्या घेऊन जातात... त्यामुळे इथला धंदा चौपट होऊन.. तिथला धंदा दसपट वाढलाय...
कोल्हापूरच नाही, तर सगळ्या महाराष्ट्रातल्या ताटातलं मटण दाक्षिणात्यांनी पळवून नेलंय.. आणि अद्यापही नेतायत... चेन्न्ई आणि बंगळुरुत 640 रुपये किलोनं मटणाची विक्री करतायत... इथले खाटिक हवालदिल आहेत.. तर खवय्ये दर कमी होण्याची वाट बघतायत.. पण असेच कंटेनरच्या कंटेनर दक्षिण भारतात जात राहिले.. तर इथल्या खवय्यांच्या ताटात मटण पडणं कठीणए...
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.