बीड : बीड जिल्ह्यात अवकाळीने कहर केला असून शेतकऱ्याचा होत्याचे नव्हते केले आहे. शेतात काढून ठेवलेला ६ एकर कांदा (Onion) पावसाने भिजल्याने सडून गेला. लाखोचा खर्च करून पदरात काहीच पडले नाही. त्यामुळं संतप्त शेतकऱ्यांनी (Farmer) त्या कांद्यावर चक्क नांगर फिरवलाय. यावेळी कांदा उत्पादक तरुण शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. (Maharashtra News)
दोन लाखाचा केला खर्च
बीडच्या चाकरवाडी गावातील तरुण शेतकरी लखन वरपे यांनी आधुनिक शेतीची कास धरत नगदी पीक म्हणून कांद्याची लागवड केली. या लागवडीसाठी खत, बियाणे, मजूर, पाणी, फवारणी असा दोन लाख रुपये खर्चही केला. यातून दहा ते बारा लाखाचे उत्पादन निघेल अशी स्वप्न लखनने पाहिले होते. योग्य वेळी कांदा काढला. मात्र मार्केटमध्ये दर कमी असल्याने दर वाढण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नावर अवकाळीने घाला घातला.
काढलेल्या कांद्यावर नांगर
बीड जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झालंय. बीड तालुक्यातील चाकरवाडी शिवारात युवा शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने पिकवलेला कांदा अक्षरशः मातीमोल झालाय. त्यामुळे यावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतात काढून ठेवलेला सहा एकर कांदा पावसाने भिजल्याने अक्षरशः चिखल झाला. तर काही ठिकाणी कोंब फुटले म्हणून वैतागलेल्या शेतकऱ्याने या कांद्यावर नांगर फिरवला. त्यावेळी अक्षरशा शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.