बीड : बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकरी हतबल झाला आहे. यामुळे इथला शेतकरी नैराश्यातून आत्महत्येचे पाऊल उचलत आहे. आज एकाच दिवशी जिल्ह्यात 2 शेतकऱ्यांनी (Farmer) आत्महत्या केल्या आहेत. तर मागील पाच दिवसात पाच आत्महत्या झाल्या आहेत. (Maharashtra News)
बीडच्या (Beed) धारुर तालुक्यातील उमरेवाडी येथील सुर्यकांत लक्ष्मण खोत यांनी परतीच्या पावसाने सर्व पीक गेले. आता कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दुसरीकडे माजलगाव तालुक्यातील राजेगांव येथील रामेश्वर लक्ष्मण रकटे (वय 23) या तरुण शेतकऱ्याने परतीच्या पावसाने हाता तोंडाशी आलेला घास हिरावून नेल्यामुळे व शेत पिकांचे झालेले प्रचंड नुकसान पाहून गळफास घेऊन आत्महत्या केली.
रामेश्वर रकटे यांच्याकडे दीड एकर शेती असून त्या शेतीमध्ये सोयाबीन कापूस व कांदा लागवड केलेली आहे. परंतु परतीच्या पावसाने आपल्या शेतातील पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याचे पाहून वर्षभराची आपल्या कुटुंबाची गुजरान कशी होणार? या विवांचनेतून रामेश्वर रकटे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पाच दिवसांपासून आत्महत्या
दरम्यान आतापर्यंत गेल्या 5 दिवसांमध्ये 5 शेतकऱ्यांनी परतीच्या पावसाने सर्वच हिरावून नेल्याने आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळं बीड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचं प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.