
शुभम देशमुख
भंडारा : शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार आतापर्यंत समोर आले आहेत. बियाणे विक्रेत्यांकडून होत असलेली (Bhandara) फसवणूक हि नित्याचीच राहिली आहे. असाच प्रकार भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथे समोर आला आहे. शेतकऱ्याला (Farmer) बियाणे कंपनीने फसवले असुन १४० दिवसात निघणारे धान ८० दिवसात निघाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. (Latest Marathi News)
मोहाडी तालुक्यांतील जांभोरा येथील शेतकरी ज्ञानेश्वर समरित यांच्याकडे २ एकर शेती आहे. दरवर्षी त्यांच्या शेतात १४० दिवसात निघणारा धान लागवड करतात. या वर्षी देखिल त्यांनी पालोरा येथील कृषि केंद्रातून १४० दिवसांत निघणार बायर कंपनीचा ६४४४ गोल्ड वाणाचा बियाणे खरेदी केले. पेरणी करुण (Bogus Seeds) धान लागवड देखील केले. हे धान १४० दिवसात निघेल असे शेतकऱ्यांना माहिती होती. पण हे धान ८० दिवसातच निघाल्याने शेतकऱ्याना मोठा प्रश्न पडला आहे.
शेती पाण्याखाली असल्याने..
समरित यांच्या शेती परीसरात तलाव असल्याने परिसरातील शेती नेहमी पाण्याखाली असते. त्यामुळे सर्व शेतकरी १४० दिवसात निघणारा धान लागवड करतात. पण लागवड केलेले धान ८० दिवसात निघाल्याने १० दिवसात हाच धान कापणीला येणार आहे. परंतु शेतात पाणी असल्याने धान कापायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. त्यामुळे यंदा त्यांच्या शेतात शेती पिकली खरी पण हातात अन्नाचा दाना येणार नाही. त्यामुळे आता बायर कंपनीने शेतीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी शेतकरी करीत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.