बुलढाणा: जिल्ह्यातील घाटावरील बहुतांशी भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक घेतले जाते. पावसाअभावी कशीबशी उगवलेली सोयाबीनवर आता नवीन संकट ओढवले आहे. सोयाबीन या पिक आता कीटक नाशकांनी ग्रासले आहे, कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.
जुलै महिन्यात मोजक्या ठिकाणी पाऊस पडला तर काही ठिकाणी पावसाने दडी मारली. त्यामुळे जून महिन्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांन पुढे पाऊस नसल्यामुळे संकट उभे राहिलं. ज्या शेतकऱ्यांचं पीक कसंबस उगवलं तर त्या पिकावर आता खोड पोखरणारी अळी, चक्रभुंगा या अळीने आक्रमण केले आहे.
दुरून हिरवेगार दिसणार सोयाबीनचे हे शेत मात्र किड, खोड अळीने पोखरून निघतयं. बुलढाणा जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन, तूर, कपाशी हे पीक घेतल्या जातं, खोड पोखरणाऱ्या अळीमुळे शेतकऱ्यांपुढे उगवलेल पीक जगवण्याचे संकट उभ ठाकलय, तसचं शेतकऱ्यांना सोयाबीनला खोड पोखरणाऱ्या अळी पासुन पीक विम्याचे संरक्षण द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.