धुळे : जून महिना उलटत आला तरी देखील धुळे जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे जवळपास पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस पेरणी होऊन देखील पाऊस नसल्यामुळे महागडे बियाणे वाया जाण्याची वेळ आली असून, दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर (Farmer) उभ ठाकले आहे. अशा परिस्थितीमध्ये सध्या राजकीय वातावरण देखील राज्याचे ज्या प्रकारे सुरू आहे ते बघता सध्याच्या राज्य सरकारला (Dhule News) शेतकऱ्यांकडे बघायलाच वेळ नसल्याची खंत शेतकऱ्यांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. (dhule news no rain and Farmers however are in trouble)
सध्या राजकीय नेतेमंडळी पळापळीमध्ये गुंतलेले असताना शेतकरी मात्र पेरणी करून देखील पाऊस (Rain) पडत नसल्यामुळे चांगलाच अडचणीत सापडला आहे. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिली, तर कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही असे मत शेतकरींतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.