सागर निकवाडे
Nandurbar Farmer News : नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या मोठा आर्थिक नुकसान केलं आहे. काढणीवर आलेल्या पिकांच्या मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेला आहे. या अवकाळी पावसामुळे ऐन सणाच्या वेळेस शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली आहे.
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नंदुरबार, नवापूर, शहादा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसोबतच व्यापारींच्या देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांकडून लाल मिरची घेऊन व्यापारी पठाऱ्यांवर वाढवण्यासाठी टाकत असतात मात्र अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे (Rain) मिरची पिकाचे देखील यात मोठे नुकसान झाला आहे.
शेतकरी आधीच अडचणीत सापडला होता त्यात निसर्गाने ओळखलेलं संकट शेतकऱ्यांसाठी मोठं जीवघेणा ठरतं की काय असाच प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून बळीराजाला आधार देण्याचे काम करावे एवढीच अपेक्षा शेतकरी वर्तन करणे केली जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.