लातूर -चालू वर्षी शेतकऱ्यांना गोगलगायीच्या संकटाला सामोरे जावं लागलं आहे जिल्ह्यात किमान चार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन (Soybean) आणि अन्य पिकावर गोगलगायीचा हल्ला झाला असल्याने त्याचा बंदोस्तासाठी शेतकऱ्यांना (Farmer) किमान शंभर कोटी रुपयांचा खर्च झाला असल्याचा दावा लातूरचे (Latur) खत आणि औषधी विक्रेते रोहन काळे यांनी दावा केला आहे.
हे देखील पाहा -
लातूर जिल्हा हा सोयाबीन उत्पादक जिल्हा अशी ओळख आहे साधारणपणे जिल्ह्यात सहा लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते तर दरवर्षी जवळपास साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी होत असते तर उर्वरित क्षेत्रावर अन्य पिकांची पेरणी केली जाते चालू वर्षी शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
लातूर जिल्ह्यात चार लाख क्षेत्रावर गोगलगायीचा धोका निर्माण झाला आहे. कोवळ्या पिकाला गोगलगायी हल्ला करून कोवळी पाने कुरतडतात यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीच संकटाला तोंड द्यावं लागतं. यासाठी किमान शंभर कोटी रुपये खर्च आला आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करावी लागली असली तरी अजूनही पूर्णपणे गोगलगायीचा नायनाट झाला नाही यामुळे हा खर्च दीडशे कोटी पर्यंत जाऊ शकतो असा दावा लातूरचे खत आणि औषधी विक्रेते रोहन काळे यांनी केला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.