
लातूर - केंद्र सरकार (Central Government) पुरस्कृत प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख १ हजार ३९९ हेक्टरवरील सोयाबीन या प्रमुख पिकासह अन्य खरीप पिकांचा विमा तब्बल ७ लाख ३७ हजार ८१६ शेतकऱ्यांनी उतरविला आहे.
या पीकविम्यापोटी ५२ कोटी १३ लाख ४४ हजार ५२५ रुपयांचा प्रीमियम विविध बँकांमध्ये जमा झाला असल्याची माहिती भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक संतोष भोसले यांनी दिली.
हे देखील पाहा -
लातूर जिल्ह्यात ६ लाख हेक्टर क्षेत्र खरिपाचे आहे. यातील ४ लाखांवर हेक्टरवर सोयाबीन पिकाचा पेरा होतो. खरिपात अल्पपर्जन्यमान, अतिवृष्टी, असमाधानकारक पाऊस यासह विविध कीडरोगांमुळे पिकांचे नुकसान होत असते. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो.
त्यामुळे केंद्र सरकारने खरीप पिकांना विमा संरक्षण मिळावे म्हणून खाजगी विमा कंपनीमार्फत पीकविमा भरुन घेतला जातो. यंदा १ ऑगस्टपर्यंत पीकविम्याचे हप्ते शेतकऱ्यांकडून ऑनलाईन व बँकांमार्फत भरुन घेण्यात आले. तब्बल ५ लाख १ हजार ३९९ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविण्यात आला असून, त्यासाठी ५२ कोटी १३ लाख ४४ हजार ५२५ रुपये भरणा करण्यात आला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.