
Jalna News : सध्या कोणत्याही भाजीपाल्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी (farmer) कमालीचा हैराण झाला आहे. उत्पादन खर्च देखील मिळत नसल्याने जालन्यातील (jalna) सोमठाणा गावातील लक्ष्मण तायडे या शेतकऱ्याने आपल्या उभ्या गोबीच्या पिकात जनावर सोडली. (Maharashtra News)
सध्या बाजारपेठेत कांदा, वांगी, टोमॅटो, मेथी, कोबी या भाजीपाल्याची आवक जास्त आहे. त्यामुळे या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात दर घसरले आहेत. सोमठाणा येथील शेतकरी लक्ष्मण तायडे यांनी एक एकर शेतावर गोबीची लागवड केली.
त्यांनी 35 कट्टे गोबी मजूर लावून ती तोडली. हा गाेबी जालन्यातील बाजार समितीत विक्रीसाठी आणला. त्यांना प्रति कट्टा 40 रुपरये दर मिळाला. त्यासाठी मजुरी 400 रुपये, वाहतूक खर्च 700 रुपये आला. 22 कट्ट्यातील 396 किलो गोबीचे त्यांच्या हाती 720 रुपये पडले.
त्यांना 380 रुपये खिशातून टाकावे लागलेत. त्यामुळे किलोला त्यांना केवळ 3.50 पैसे दर मिळल्याने आणि लागवड आणि औषधींचा खर्च पाहता 20 हजाराचा खर्च झाल्याने शेतकरी लक्ष्मण तायडे यांनी संतप्त हाेऊन उभ्या गोबीच्या पिकात जनावर चरण्यासाठी सोडून दिले.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.