जालना : दिवाळीच्या आधीच राज्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीची मदत जमा करणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी जालन्यात केली. आज भुसे हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
हे देखील पहा :
या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील कृषी विभागाच्या विविध योजनेचा आढावा घेतला.त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. दोन दिवसानंतर 3 हजार 600 कोटी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.
जून महिन्यात झालेल्या नुकसानीचे 350 कोटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत असल्याची माहिती भुसे यांनी दिली. जसे जसे पंचनाम्यांचे कागदपत्रे राज्य सरकारकडे येतील तशी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा करणार असल्याचं देखील कृषी मंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.