हिंगोली - मुसळधार पाऊस व अतिवृष्टीने चाळीस हजार हेक्टरवर लागवड करण्यात आलेल्या तुरीच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. ऐन फुले लागण्याच्या उमेदीत पावसाच्या पाण्याने सेनगाव, औंढा वसमतसह हिंगोली तालुक्यात तुरीची झाडे उन्मळून पडली आहेत. त्या मुळे तुरीचे उत्पादन पंचवीस टक्क्यांवर आले आहे.
हे देखील पहा -
यामुळे व्यथीत होऊन, हिंगोली तालुक्यातील दिग्रस गावातील प्रगतिशील शेतकरी शिवाजी कराळे यांनी स्वताच्या शेतातील तुरीच्या पिकांवर नांगर फिरवत पीक उध्वस्त केलं आहे. कराळे यांच्यासह अनेक तालुक्यातील शेतकरी देखील आता तुरीचे पिक काढून टाकत असल्याने जिल्ह्यात यंदाच्या वर्षी तूर डाळीचा तुटवडा देखील निर्माण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.