अवेळी पावसाने शेतकरी हतबल; 1200 हेक्टरपेक्षा अधिकच्या रब्बी पिकांचे नुकसान

काल झालेल्या अवेळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर या पावसाने शेतातील संपूर्ण ज्वारीचं पिकं आडवं झालं आहे.
अवेळी पावसाने शेतकरी हतबल; 1200 हेक्टरपेक्षा अधिकच्या रब्बी पिकांचे नुकसान
अवेळी पावसाने शेतकरी हतबल; 1200 हेक्टरपेक्षा अधिकच्या रब्बी पिकांचे नुकसानराजेश काटकर

परभणी : जिंतूर तालुक्यातील झरी शिवारात काल झालेल्या अवेळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर या पावसाने शेतातील संपूर्ण ज्वारीचं पिकं आडवं झालं आहे. त्यामुळे ऐन जोमात आलेली पिकांचं पावसाने नुकसान झाल्य़ाने आता जगायचा कसं? असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकरी विचारत आहेत.

अवेळी पावसाने शेतकरी हतबल; 1200 हेक्टरपेक्षा अधिकच्या रब्बी पिकांचे नुकसान
गर्दी होत असेल तर बार आणि दारुची दुकाने बंद करावी लागणार- राजेश टोपे

आधीच लॉकडाऊनमुळे (Lockdown) शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. अशातच अवेळी पडलेल्या पावसाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शिवाय काल पडलेल्या पावसामुळे तुरीच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे सद्यस्थितीला तुरीचे पीक कापून टाकल्यामुळे जमिनीवर आडवे असलेल्या पिकांना या पावसामुळे बाधा निर्माण झाली आहे.हा पाऊस जिंतूर तालुक्यातील झरी सह मिर्झापूर, साडेगाव, संबर, सावंगी, जलालपूर मांडवा डिग्रस पिंपळा नांदापूर आदी गावांना असल्यामुळे सदरील गावातील बाराशे हेक्टरच्या वरती ज्वारी, गहू, हरबरा व काढून ठेवलेल्या तुरीचे नुकसान झाले आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com