जामनेर (जळगाव) : कापसाला भाव नसल्याने देवळसगाव येथील एका ४२ वर्षीय शेतकऱ्याने (Farmer) घेतलेले बँकांचे कर्ज वेळेत फेडता येत नसल्याने विषारी पदार्थाचे सेवन करून आपल्या शेतातच (Jalgaon News) आपली जीवनयात्रा संपविली. गोपाळ नारायण राजपूत (वय ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. (Live Marathi News)
देवळगाव (ता. जामनेर) येथील गोपाळ राजपूत यांच्या नावावर अडीच- तीन एकर शेतजमीन आहे. त्यामध्ये सध्या कपाशी लागवड केली असून, आधीच्या वेचणी झालेल्या कपाशीला बाजारात पुरेशा प्रमाणात भाव मिळत नाही. तर दुसरीकडे अस्मानी संकट अशा दुहेरी संकट आहे. भाव मिळत नसल्याने कापूस घरातच पडून आले. कापूस (Cotton) विकला जात नसल्याने पैसा हातात नाही.
चार लाखाचे कर्ज
या अशा विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्याच्या डोक्यावरील तीन ते चार लाखांपेक्षा अधिकच्या कर्जाची वेळेच्या आत परतफेड करता आली नाही, परिणामी शेतकरी गोपाळ राजपूत यांनी टोकाचा निर्णय घेतला आणि आपली जीवनयात्रा संपविली. मृत गोपाळ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. जामनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.