जळगाव - केवळ चालक नसल्याने केळीने भरलेली रेल्वे मालगाडी सावदा स्टेशनवर तब्बल १२ तास उभी असल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांनी (Farmer) रेल्वे प्रशासनाचे रोष व्यक्त करत थेट रेल्वे (Railway) मंत्रालयातच या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर मध्यरात्री एक वाजता चालक उपलब्ध झाल्यानंतर गाडी दिल्लीकडे रवाना झाली.
दरम्यान याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मालगाडीत रात्रीच लाखो रुपयांची केळी भरण्यात आली होती. चालक नसल्याने मालगाडीला विलंब झाल्याने लाखो रुपयांच्या केळीच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण असा ही प्रश्न यावेळी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
हे देखील पाहा -
रात्री उशिरापर्यंत लोड करण्याचं काम केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून चालू होतं व रात्री बारा वाजता ते पूर्ण होऊन एक तासात सावदा रेल्वे स्टेशनवरून गाडी निघायला हवी होती. मात्र ती तब्बल १२ तास चालक नसल्याने रेल्वे स्टेशनवर उभी होती. केळीच्या भरलेली रेल्वे गाडी 12 तास सावदा स्टेशनवर उभी होती. हे नाशिवंत फळ असल्याने ते जास्त वेळ टिकत नाही.
या गाडीतील केळी खराब होवुन तिला कमी भाव मिळून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होईल व याला रेल्वे प्रशासनच जबाबदार राहील असे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेवटी स्थानिक पत्रकारासह शेतकऱ्यांनी रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला. त्यानंतर साडे बारा वाजता केळीची भरलेली मालंगाडी दिल्लीकडे कडे रवना झाली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.