
Jalgaon: जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ऐन काढणीवर आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. यात गहू (Wheat) व हरभरा पिकाचे अधिक नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे (Jalgaon News) जिल्ह्यातील ८ हजार ९६६ हेक्टरवरील क्षेत्राला फटका बसला आहे. (Breaking Marathi News)
मका, ज्वारी, बाजरी मातीमोल वादळी पावसामुळे मका, ज्वारी, बाजरी, दादर, गहू, सूर्यफूल, हरभरा पिके क्षणात मातीमोल झाली. जिल्ह्यात भडगाव, पाचोरा आणि जामनेर तालुक्यात काही भागात अवकाळी पाऊस आणि वादळाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ६ मार्चला रात्री पाऊस आणि वादळाचा फटका काढणीवर आलेल्या ज्वारी, बाजरी, गहू, मका, हरभरा, लिंबू, आंबा, पपई या पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.
एरंडोल तालुक्यात सर्वाधिक नुकसान
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, चोपडा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण नुकसानीपैकी एरंडोल तालुक्यात निम्म्या म्हणजेच ४ हजार ६२९ हेक्टरवर फटका बसला आहे. तर त्याखालोखाल (Dharangaon) धरणगावमध्ये २ हजार तसेच चोपड्यात १ हजार ३०८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
वीज पडून गुरांचाही मृत्यू
गेल्या दोन दिवसांत वादळासह पावसामुळे पशुधनाची हानी झाली. वीज पडून धरणगाव येथे दोन म्हशी तर भुसावळ तालुक्यात एक बैल मृत्युमुखी पडले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.