दीपक क्षीरसागर
लातूर : लातुर Latur जिल्ह्यातील औसा Ausa तालुक्यातील किनीथोट येथील शेतकरी व्यंकट सिद्राम भुजबळ यांनी शेतातील तीन एक्करवरील सोयाबीनची Soybean काढणी करून सोयाबीन बनीम शेतात रचून ठेवली होती. काल रात्री अज्ञात लोकांनी सोयाबीन पेटवून दिले आहे. यामध्ये सदरील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नुकसानीचा पंचनामा तलाठी कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
हे देखील पहा-
अतिवृष्टीच्या अस्मानी संकटात अगोदर शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सततच्या दुष्टचक्रातून शेतकरी पुरता हवालदिल झाला असताना तीन एकरवरील सोयाबीनची काढणी करून ठेवलेले सोयाबीन अज्ञात लोकांनी पेटवून दिले.
यावेळी डोळ्यासमोर उभे सोयाबीन जळत असताना अवघ्या खरिप हंगामातील मेहनत हातून गेलेल्या शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाने नुकसानीची माहिती घेऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तीन एक्करवरील सोयाबीनची बनीम जळाल्याने शेतकरी व्यंकट सिद्राम भुजबळ यांचे सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाले आहे याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
Edited By-Sanika Gade
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.