बांधकाम विभागाचा भाेंगळ कारभार; ४ एकर शेती बळीराजाच्या डोळ्यांसमोर गेली खरडून

शेतकऱ्याचे मोठे नुकसान
Amravati News
Amravati NewsSaam Tv

अमर घटारे

अमरावती - जिल्ह्यतिल सार्वजनिक बांधकाम विभागाने अरुंद पुलाचे बांधकाम केल्यामुळे अमरावती (Amravati) जिल्ह्यातील नेरपिंगळाई येथे राहणाऱ्या राजेंद्र लोचन या शेतकऱ्याचे (Farmer) चार एकर कपाशी लागवड केलेले शेत पावसाच्या पहिल्या पाण्यातच खरडून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

राजेंद्र लोचन यांचे शेत नेरपिंगळाई ते तिवसा रोडवर असून त्यांच्या शेताजवळ सार्वजनिक बंधकांम विभागानेने पुल बांधला. त्यावेळी शेतकऱ्याने वेळोवेळी अधिकाऱ्यांना सांगितल मात्र त्याकडे त्याकडे कोणीही लक्ष दिलं आहे.

हे देखील पाहा -

शेतकऱ्याने पुल अरुंद असल्याची तक्रार एप्रिल महिन्यातच केली होती. परंतू त्या तक्रारीकडे सां.बा. विभागाने दुर्लक्ष केले परिणामी अरुंद पुलामुळे पावसाचे पाणी तुंबून शेतात गेले 4 एकर शेत खरडूंन गेले. शेतकऱ्याने शेतात कपाशीची लागवड केली होती.

मात्र जिल्ह्यात पहिला पाऊस जोरदार झाल्याने पाहिल्या पवसातच 4 एकर कपाशी लागवड केलेली शेतजमीन संपूर्ण खरडूंन गेली. यामध्ये शेतकऱ्याने कपाशीचे बियाणे आणून आपल्या शेतात लागवड केली होती.

Amravati News
लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक; दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू

कपशी लागवडीला देखील मोठा खर्च केला. लागवड करताना खते दीली यामध्ये पन्नास ते साठ हजार रुपयांचा खर्च देखील शेतकऱ्याचा पूर्ण वाया गेला आहे. आता शेत जमीनी खरडूंन तर गेली पण शेतीला लावलेला खर्च देखील पावसाच्या पाण्यात बुडाला आहे. त्यामुळे आता यांची नुकसान भरपाई सार्वजनिक बंधकांम वीभाग देईल का? असा प्रश्न निर्माण होतो आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com