पंढरपूर : शेती पंपाचा वीज पुरवठा तोडाल तर याद राखा, शेतकऱ्यांची वीज वितरण कंपनीकडे लाखो रुपयांचे येणे असताना जर वीज पुरवठा खंडित केला तर वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना झाडाला बांधून मारू असा गर्भित इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आज पंढरपुरात दिला.
थकीत वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने मोहीम सुरू केली आहे सोलापूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे खरीप पिके जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना वीज कंपनीच्या वीज तोडणी मोजणीच्या विरोधात पुढे सरसावली आहे.
विजेचे खांब आणि डीपी यासाठी वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना भाडे मिळणे अपेक्षित असताना उलट शेतकऱ्यांकडून वीज बिल वसुली साठी शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे, हे यापुढे आता खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
शेती पंपाचा वीज पुरवठा तोडाल तर याद राखा असा सूचक इशारा देत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना झाडाला बांधून मारू असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे मनसेच्या इशाऱ्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
Edited By - Amit Golwalkar
हे देखिल पहा-
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.