नांदेड : नांदेडमध्ये नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि सततच्या नापिकी यात डोक्यात दीड लाखाहून अधिकचे कर्ज होते. याच विंवचनेत तरुण शेतकऱ्याने (Farmer) विषप्राशन करुन आत्महत्या केली. (Nanded News Farmer Suicide)
हिमायतनगर तालुक्यातील (Nanded News) सरसम येथील ही धक्कादायक घटना आहे. राजु पुंजाराम गोटमवाड असे आत्महत्या (Suicide) केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. राजु गोटमवाड याला केवळ दिड एकर शेती आहे. राजु हा शेती आणि मजुरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह (farmer Suicide) चालवत होता. आठ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार (Rain) पावसामुळे शेताकडे जाणे शक्य झाले नाही.
दिड एकरातील सोयाबीन पाण्याखाली
मात्र, गुरूवारी राजुने शेतात जाऊन पाहिले असता शेतात सर्वत्र पाणी साचलेले दिसले. दिड एकरात पेरलेले सोयाबीन वाया गेल्याने राजु तणावात होता. मागच्या वर्षीही अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आणि यंदाही हाताला काही लागणार नाही. या चिंतेत राजु होता. शिवाय स्टेट बँक ऑफ इंडियाचे 64 हजार आणि खाजगी सावकाराचे एक लाख असे एक लाख 64 हजाराचे कर्ज होते. राजुच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असून त्यांना दोन मुली, एक मुलगा, पत्नी असा परिवार आहे. राजुने याच चिंतेतून आज सकाळी विषप्राशन केले. दरम्यान या घटनेमुळे सरसम गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.