नंदुरबार : केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यापारी बागांमध्ये केळीला (Banana) अवघ्या ३ ते ४ रुपये किलो दराने मागणी केली जात आहे. या दराने माल दिल्यास खर्चही सुटत नाही, असे शेतकऱ्यांचे (Farmer) म्हणणे आहे. उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी किमान १० ते १५ रुपये किलोचा दर शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. (Nandurbar Banana Farmer)
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातही केळीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. उसाला पर्यायी पीक म्हणून केळीकडे पाहिले जाते. उसाच्या तुलनेत केळी लागवडीचा (Banana Crop) खर्च अधिक असला तरी उत्पन्न चांगले मिळते. मात्र गेल्या दोन वर्षांत केळी उत्पादक पुरता उद्ध्वस्त झाला आहे.
४० रूपये डझनने विक्री
केळीची खरेदी उत्पादकांकडून अवघ्या ४ ते ८ रुपये किलो दराने होत आहे. मात्र बाजारात हीच केळी ग्राहकांना ३० ते ४० रुपये डझन या दराने विक्री होत आहेत. कारण कच्ची केळी एक फणी तीन किलो भरते. केळी काढण्याची मजुरी तसेच फ्रीजरमध्ये ७ दिवस ठेवून पिकवण्याचा असा एकूण जवळपास व्यापाऱ्यांनाही 20 ते 25 रुपये खर्च येतो. त्यामुळे व्यापाऱ्यांनाही दोन पैसे मिळावे; या उद्देशाने केळीचे दर 30 ते 40 रुपये डझन असल्याचे व्यापाऱ्यांकडून बोलले जात आहे. आजपासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवात केळीचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.