
सागर निकवाडे
नंदूरबार : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा परिणाम भाजीपाला पिकांच्या (Nandurbar News) उत्पादनावर होणार आहे. येणाऱ्या काळात भाजीपालाचे उत्पादन कमी होऊन भाजीपाल्याचे दर गगनाला भिडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)
नंदुरबार जिल्हा गुजरातचा सीमा वरती भागात आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला गुजरात राज्यातील मोठ्या शहरांसह महाराष्ट्रातील ही मोठ्या बाजारपेठांमध्ये जात असतो. मात्र गेला आठवडाभर नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा फटका मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांना बसला आहे. यात बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा (Farmer) संकटात सापडला आहे.
उत्पादन घटल्याचा अंदाज
भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. टमाटे, कोबी आणि मिरची, वांगे यासोबत इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भाजीपाला उत्पादन घटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नैसर्गिक संकटाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. येणाऱ्या काळात बाजारपेठ मधील भाजीपाल्याचे आवक घटून भाव वाढीची शक्यता देखील आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.