
सागर निकवाडे
नंदूरबार : शेती परवडत नाही, शेतीत आता काही राहिसलेल नाही; अशी ओरड नेहमीच ऐकू येते. मात्र शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास शेतीही फायद्याची होऊ शकते, हे अनिल पटेल तरुण शेतकऱ्यांनी (Farmer) सिद्ध करून दाखवले. पारंपरिक पिकांना फाटा देत त्यांनी आठ एकर जमिनीत भाजीपाला शेती केली आणि त्यातून लाखोचा नफा कमवला आहे. (Letest Marathi News)
शहादा तालुक्यातील फेस येथील शेतकरी अनिल पटेल यांच्याकडे आठ एकर शेती आहे. वडिलोपार्जित असलेल्या शेतीत पारंपारिक पिकं घेत होते. उत्पादनाची शाश्वती नव्हती त्यांनी शेतीत नवीन प्रयोग करण्याचा विचार केला. पारंपारिक पिकांना फाटा देत भाजीपाला शेतीची निवड त्यांनी केली. निवड त्यांनी केली या शेतीतून त्यांनी मिरची आणि टमाट्याची लागवड केली.
दोन एकर क्षेत्रावर टमाट्याची लागवड केली असून त्यांना एक लाख ३५ हजार रुपयांचा खर्च झाला टमाट्याची काढणी सुरू झाली असून २५०० ते ३ हजार कॅरेट टमाटे दुसऱ्या तोडणीत निघतील; असा अंदाज असून दुसऱ्याकडून त्यांना जवळपास पाच लाख रुपयांचे उत्पादन निघण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. पाच लाख रुपयाचा नफा निघणार असल्याने. पारंपारिक शेतीपेक्षा भाजीपाला शेती शाश्वत उत्पादनाचा मार्ग सापडला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.