सोलापूर जिल्ह्यात अद्याप पीक पंचनाम्याचा आदेश नाही...
सोलापूर जिल्ह्यात अद्याप पीक पंचनाम्याचा आदेश नाही...विश्वभुषण लिमये

सोलापूर जिल्ह्यात अद्याप पीक पंचनाम्याचा आदेश नाही...

लवकर पंचनामे करून ठोस मदत देण्याची द्राक्ष बागायतदार संघाची मागणी...

सोलापूर - सांगली आणि अहमदनगर प्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील फळबागांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. सांगली आणि अहमदनगर मधील नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत.मात्र, आठवडा उलटला तरी अद्याप पंचनामे सुरू झाले नाहीत. द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे शेती पिकांच्या पंचनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

तसेच ठोस मदत करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. मागील तीन वर्षापासून द्राक्ष बागायतदार मोठ्या अडचणीत आहेत. चालू हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात अद्याप पीक पंचनाम्याचा आदेश नाही...
हे सरकार पडेल अस वाटत नाही - राज ठाकरे

द्राक्ष बाग जोपासण्यासाठी एकरी 3 लाखाचा खर्च येतो आणि जवळपास तो खर्च झालेला असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडला आहे. द्राक्षवर अवलंबून असणारे शेतमजूर ते औषध विक्रेते या सर्वांवर याचा परिणाम होणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने ठोस मदत करावी अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाने केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com