
Palghar : पालघर (palghar) जिल्ह्यात डहाणू, पालघर, तलासरी या तालुक्यांमध्ये चार हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर मिर्चीची (chilli crop) लागवड केली जाते. परंतु वातावरणातील बदलामुळे सध्या मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. बहुतांश ठिकाणी मिरची पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.
पालघर जिल्ह्यात तिखट मिरचीसह, आचारी मिरची, भोपळी मिरचीचे उत्पादन घेतलं जाते. सध्या मिरचीच्या झाडावर येणाऱ्या थ्रिप्स, माइट्स, व्हाईट फ्लाय किडीच्या प्रादुर्भावामुळं जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठ्या शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळं पालघर जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी चितेंत पडला आहे. (Maharashtra News)
सध्या लाखो रुपये खर्च करून लागवड केलेली मिर्ची संकटात आली आहे. औषध फवारणी करूनही रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने हजारो हेक्टर वरील मिर्चीची लागवड अस्मानी संकटात सापडली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे.
जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी मिरची पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मिरची उत्पादनात कमालीच घट हाेणार आहे. परिणामी शेतक-यांना याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.