पंकजा मुंडे समर्थकांमध्ये पुन्हा नाराजीचा सूर !

परळीमधील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने, कर्मचाऱ्यांचा 1 कोटी 46 लाख रुपयांचा भविष्य निर्वाह निधी भरणा केला नसल्याच्या कारणावरून, कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे.
पंकजा मुंडे समर्थकांमध्ये पुन्हा नाराजीचा सूर !
पंकजा मुंडे समर्थकांमध्ये पुन्हा नाराजीचा सूर !SaamTv

बीड - मुंडे भगिनींवर भाजपकडून जाणीवपूर्वक अन्याय होत असल्याचा आरोप करत, मुंडे समर्थकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता. मंत्री पदावरून राजीनामा सत्र सुरू झाले होते. यावर कुठेतरी पूर्णविराम बसला असताना, आता पुन्हा एकदा बीडमध्ये मुंडे समर्थकांतून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. Pankaja Munde supporters disfavour again!

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या, परळीमधील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने, कर्मचाऱ्यांचा 1 कोटी 46 लाख रुपयांचा भविष्य निर्वाह निधी भरणा केला नसल्याच्या कारणावरून, कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे. ही कारवाई क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांनी मात्र कारवाई झालीचं नाही असा दावा पत्रकबाजी करून केला आहे.

हे देखील पहा -

तर या सर्व प्रकारामुळे मुंडे समर्थकांतून नाराजीचा सूर निघत असल्याचं पहायला मिळत आहे. अगोदरचं मंत्रीपदावरून राजीनामासत्र सुरू झालं होतं. यावर पंकजा मुंडे यांनी बैठक घेऊन, या राजीनामा सत्राला पूर्णविराम दिला होता. आता पुन्हा एकदा कारखान्याच्या कारवाईनंतर पंकजा मुंडे समर्थकांत नाराजी पसरत आहे.

या विषयी भाजपचे जेष्ट नेते राजाभाऊ मुंडे म्हणाले, वैद्यनाथ कारखाना गेल्या चार पाच वर्षापासून अडचणीत होता. यावर्षी सुरू झाला आहे. मात्र कारखाना बंद असल्यामुळे दोन वर्षाचा कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरता आला नाही. असे महाराष्ट्रात बरेच कारखाने आहेत, की ज्यांनी कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी भरलेला नाही, त्यामध्ये एक वैद्यनाथ कारखाना आहे. मात्र पंकजा मुंडे यांना निव्वळ बदनाम करणे, ब्लॅकमेल करण्यासाठी असं कटकारस्थान विरोधक मंडळी आणि काही मातब्बर मंडळी करत आहेत. असा गंभीर आरोप देखील मुंडे यांनी केला आहे.

पंकजा मुंडे समर्थकांमध्ये पुन्हा नाराजीचा सूर !
चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा गळा आवळून खून; आरोपी पतिचे आत्मसमर्पण

राजाभाऊ मुंडे यांनी यावेळी भाजपवर देखील त्यांनी पुन्हा एकदा उघड नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की या अगोदर प्रीतम मुंडे यांना मंत्री पदापासून डावललं गेलं आहे. मुंडे घराण्यावर हा नेहमीच अन्याय होत असून त्यामागचं षड्यंत्र अद्याप काही लक्षात आलेले नाही. मात्र याविषयी मुंडे समर्थक नाराज आहे. या राज्यामध्ये मुंडे साहेबांनी भारतीय जनता पक्ष निर्माण केलेला आहे. मात्र ते गेल्यानंतर मुंडे कुटुंबातील मुलींवर अन्याय होत आहे. मात्र अशा षडयंत्राला मुंडे समर्थक कधीच भीक घालणार नाहीत. या सर्व प्रकाराला मुंडे समर्थक सडेतोड उत्तर देतील. असा सज्जड इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मुंडे समर्थक राजाभाऊ मुंडे यांनी दिला आहे....

तर या विषयी शेतकरी नेते भाई मोहन गुंड म्हणाले, की दोन दिवसापूर्वी वैद्यनाथ कारखान्यावर जी कारवाई झाली, ती कामगारांच्या हक्काच्या पैशासाठी करण्यात आली आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई योग्य आहे. कामगारांचा भविष्य निर्वाह निधीचे पैसे या कारखान्याने दिले नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांना उसाच्या एफआरपी प्रमाणे पैसे दिले नाहीत. आणि आता जर या कारवाईमुळे कारखानदारांना वाईट वाटत असेल, तर त्यांनी या गोरगरीब कामगार आणि शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत. अशी आम्ही विनंती करतो. अन्यथा वैद्यनाथ कारखान्याविरोधात कामगार व शेतकऱ्यांसाठी आम्ही आंदोलन करू. असा इशारा शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी दिला आहे..

दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रीतम मुंडे यांना डावलल्याने मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. यातून राजीनामासत्र सुरू झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा वैद्यनाथ कारखाना कारवाई प्रकारणावरून, मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com