
बुलढाणा : विदर्भातील शेतक-यांना तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत तातडीने सरकारने द्यावी. सरकारनं असं केले नाही तर ज्या प्रकारे श्रीलंकेत राष्ट्रपतींच्या घरात जनता घुसली होती त्याप्रमाणे राज्यातील जनता लोकप्रतिनिधींना रस्त्यांवरुन फिरू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) नेते रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांनी दिला आहे. उद्या (मंगळवार) पासून स्वाभिमानी शेतकरी संघटना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना (farmers) तात्काळ मदत मिळावी यासाठी मोठं आंदोलन उभारणार आहाेत असा इशाराही तुपकर (ravikant tupkar) यांनी यावेळी दिला आहे. (Ravikant Tupkar News)
रवीकांत गेल्या दहा दिवसांत एकट्या विदर्भात अतिवृष्टीमुळे जवळपास अडीच ते तीन लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र राजकारणी , आमदार हे मंत्रीपदाच्या फिल्डिंगमध्ये व्यस्त आहेत. एकाही आमदाराला शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही. विदर्भातील शेतकऱ्याला या सरकारने वाऱ्यावर सोडलं असून ज्याप्रकारे रोम जळत होता आणि राजा बिगुल वाजवत बसला होता तशी अवस्था विदर्भाची झाली आहे.
महाराष्ट्रातील स्थिती अस्थिर बनत चालली आहे. तीन तीन लाख लाेकांतून निवडून आलेल्या लाेकप्रतिनिधींनी शेतक-यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार सुरु केला आहे. विदर्भातील शेतक-यांना तातडीनं मदत न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदाेलन छेडेल असा इशारा रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.