Wardha News : वर्धा जिल्ह्यातील सात प्रकल्पांत ९० टक्क्यांवर जलसाठा; रब्बी हंगामाची समस्या मिटली

रब्बी हंगामातील पिकांसाठी थंडीसुद्धा पोषक आहे.
Water
Water Saam TV

- चेतन व्यास

वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे. सात प्रकल्पांत ९० टक्क्यांच्यावर जलसाठा आहे. त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. शेतकऱ्यांना उन्हाळी पिकेही घेता येणार आहे.

यंदा अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तब्बल दोन ते अडीच महिने सतत पाणी सुरू होता. वर्धा जिल्ह्यात १०० टक्केपेक्षा अधिक पाऊस (rain) पडला. प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करावा लागला. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात सात मोठ्या प्रकल्पांत ९० टक्क्यांच्यावर जलसाठा आहे.

Water
Chhatrapati Shivaji Maharaj : उदयनराजेंचा 'निर्धार शिवसन्मानाचा' यास राजकीय वास; शिवेंद्रराजे

त्यामुळे शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील सिंचनाची समस्या मिटली असून उन्हाळ्यातही पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार नाही. जिल्ह्यातील बोर प्रकल्प, निम्न वर्धा प्रकल्प, धाम प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, मदन प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प आणि सुकळी लघू प्रकल्पात ९० टक्क्यांच्यावर जलसाठा आहे.

Water
Karnataka Maharashtra Border Dispute : सीमावादाचा उडणार भडका ? मंत्री म्हणाले, महाराष्ट्राची जनता संयमी !

इतर धरणेही पाण्याने तुडूंब भरली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात यंदा पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. यंदा पाऊस शंभर टक्के पडला. तर थंडीनेही जोर पकडला आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी थंडीसुद्धा पोषक आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल,अशी शेतकऱ्यांना (farmers) अपेक्षा आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com