
लातूर - जिल्ह्यातील औसा तालुक्यातील फत्तेपुर शिवारात असलेल्या औसा-लामजना मुख्य रस्त्यालगतच्या खडी केंद्राच्या धुराड्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. तर पैश्याच्या जोरावर सदरील खडी केंद्र मालकाने रस्ता अडवल्याने शेतकऱ्यांना (Farmer) शेती करणे कठीण जात आहे.
हे देखील पाहा -
शिवाय या खडी केंद्रातून निघत असलेल्या भुकटीमुळे शेतकरी आणि गावाकऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होवून अनेक आजाराचा सामना करावा लागत आहे. गेल्या १० वर्षापासून सातत्याने हे नुकसान होत असल्याने त्रासलेल्या शेतकऱ्यांनी प्रदूषण विभागाकडे खडी केंद्र बंद करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा लामजना महामार्गवरील फत्तेपूर गावाजवळील खडी केंद्रात खडी काढण्यासाठी ब्लास्टिंग करत असून या खाणीतील दगडाच्या उत्खननासाठी केलेल्या स्फोटाने परिसरातील शेतकऱ्यांच्या बोअरचे पाणी गेले आहे. धुराड्याने अनेक शेतकऱ्यांच्या फळपिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या १० वर्षापासून सातत्याने हे नुकसान होत असल्याने त्रासलेल्या शेतकऱ्यांनी प्रदूषण विभागाकडे खडी केंद्र बंद करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.