सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक संकटात, उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

सतत दीड महिन्यापासून पडणारा पाऊस यामुळे लाखो हेक्टरवरील सोयाबीनची नासाडी झाली
सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक संकटात, उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त
सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक संकटात, उत्पादक शेतकरी चिंताग्रस्तसंजय राठोड

संजय राठोड

यवतमाळ : सतत दीड महिन्यापासून पडणारा पाऊस यामुळे लाखो हेक्टरवरील सोयाबीनची नासाडी झाली आहे. आता उरले सुरले सोयाबीन मशीनने काढले जात आहे. मात्र शेतात पाणीच- पाणी असल्याने शेतकऱ्यापुढे नवी समस्या उभी राहिली आहे. सोयाबीन पाण्यात चिखलात उभे आहे, ते कसे काढावे या विवंचनेत शेतकरी आहे.

हे देखील पहा-

मजूर लावून काढले तर अडीच हजार रूपये एकर काढणी आणि ३०० रुपये प्रति पोते मळणी हा भाव द्यावा लागतो. त्यामुळे सोयाबीन लावगडीचाही खर्च निघेनासे झाले आहे. अशात उत्तरप्रदेश, हरियाणा इथून चेन असलेल्या मशीन सोयाबीन काढणीस दाखल झाले आहेत. चिखल पाण्यात देखील या मशीन सोयाबीन काढत आहेत.

सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक संकटात, उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त
भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सोयाबीन कापणीचा हंगाम ऐन तोंडावर आला असताना धो- धो पाऊस कोसळत आहे. पाऊस न थांबल्यास सोयाबीनची कापणी कशी करावी. असे मोठे संकट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. अतिपावसाने खरिपाचा हंगाम धोक्यात आल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. त्याही निम्म्याहून कमी खर्चात यामुळे शेतकऱ्यांना मशीनचा मोठा आधार झाला आहे. मजुरांच्या समस्या आटोक्यात येण्यास मदत झाली असली, तरी शेतात पाणी असल्याने मशीनचा देखील नाईलाज झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com