
- रणजीत माजगावकर
Kolhapur News : यंदाच्या हंगामात राज्यात उसाचे उत्पादन आणि पर्यायाने साखर उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर उद्योग पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी परराज्यातील कारखान्यांना ऊस घालण्यास बंदीचे आदेश अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले आहेत. (Maharashtra News)
गाळप हंगाम 2023 - 24 मध्ये साखर उद्योग पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी परराज्यात ऊस घालण्यावर बंधन घालणे आवश्यक आहे. त्यामुळे ऊस नियंत्रण आदेशातील तरतुदीनुसार ही बंदी घालण्यात येत आहे. हा आदेश 30 एप्रिल 2024 पर्यंत लागू राहणार आहे असे नमूद करण्यात आले आहे. (sugarcane prohibited issue marathi news)
राज्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे उसाची पुरेपूर वाढ झालेली नाही. या सर्वांचा परिणाम उसाच्या पर्यायाने साखरेच्या उत्पादनावर होणार आहे. कर्नाटकचे साखर कारखाने लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे कर्नाटकच्या सीमेवर असलेले कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि पुढे लातूर जिल्ह्यातील उसाची पळवा पळवी होण्याची शक्यता आहे. असं झालं तर आपल्याकडील साखर हंगाम 100 दिवस ही चालणार नाही. या सर्वांचा विचार करून निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान साखर कारखानदारांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (raju shetti latest marathi news) यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
मागील तीन वर्षांचा हिशोब साखर कारखान्याकडून सरकारला मिळालेला नाही. हा हिशाेब घेतला असता तर शेतकऱ्यांना एफआरपीहुन अधिक पैसे मिळाले असते. त्यामुळे राज्य सरकारला शेजारच्या राज्यात ऊस पाठवू नये असे सांगण्याचा नैतिक अधिकार नाही. या आदेशाला आम्ही उसाच्या सरीत गाढून टाकू असेही राजू शेट्टींनी म्हटले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.