
मनोज जयस्वाल
वाशिम : पावसाचा लहरीपणा यात होत असलेले पिकांचे नुकसान. याची चिंता लागून होती. शिवाय शेतीतून उत्पन्न मिळणार नसल्याने कर्ज (Washim) कसे फेडायचे याची चिंता लागून लागून होती. याच विवंचनेत शेतकऱ्याने (Farmer) आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मानोरा तालुक्यात घडली आहे. (Latest Marathi News)
वाशीमच्या मानोरा तालुक्यातील गव्हा येथील संदीप राठोड (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सततची नापीकी, वाढत चाललेला कर्जाचा डोंगर यामुळे कर्ज कसे फेडावे व संसार कसा चालवा या विवंचनेत संदीप राठोड होते. याच विवंचनेत शेतकऱ्यांने शेतात जात विषारी द्रव्ये प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
इतरांसारखे उत्पादनाची अपेक्षा
आपल्या शेतातही इतरां सारखे उत्पादन व्हावे व आपलीही आर्थिक प्रगती होऊन आपले कुटुंबही सुखी व्हावे यासाठी धडपड करत आपल्या आई व वडील यांचे नावावर असलेल्या साडेतीन एकरावर ४५ हजार रुपयाचे दी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज घेतले. तेवढे कर्ज फेडणे कठीण होत असल्याने संदीप यांनी टोकाचे पाउल उचलले आणि आपली जीवनयात्रा संपवली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.